उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी क्रीडा संकुलातील व्यापायांना बैठक घेऊन दिल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पायाला भिंगरी लावली आहे.कोणतीही समस्या असो ती सोडवण्यासाठी स्वतः उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे पुढे होऊन तिचा निपटारा करत आहेत. छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गाळे धारकांचा कचरा एका कोप्रयात पडून राहत होता.त्यावर त्यांनी लगेच स्वतः तेथील व्यापायांची व क्रीडा संकुलातील अधिकायांची बैठक घेऊन सूचना देत तो प्रश्न सोडवला.तो कचरा उचलला होता. दरम्यान, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे शहरातील समस्या सोडवण्यासाठी पायाला भिंगरी लावून काम करत आहेत.
शहरातील कसलीही समस्या सोडवण्यासाठी आता उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कंबर कसली आहे. शहरात कुठलीही समस्या असो कचरा कुठेही पडलेला असो, कुठेही पाण्याची गळती लागलेली असो त्या समस्यांबाबत नागरिकांनी थेट उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना संपर्क साधल्यास ते स्वतः त्या समस्येचा निपटारा करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे.क्रीडा संकुल येथील व्यापारी गाळ्याच्या समोर कचरा पडल्याची तक्रार प्रकाश गवळी यांनी केली.ती तक्रार पाहून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लगेच आरोग्य विभागाकडून माहिती घेत तो कचरा उचलण्याच्या सूचना दिल्या. तसेच मनोज शेंडे यांनी तेथील 105 गाळे धारकांच्या सोसायटीच्या प्रमुख पदाधिकायांना व कार्यकर्ते यांना बोलावून घेऊन प्रत्येक गाळे धारकांनी स्वत डसबिन ठेवून त्यात कचरा टाका, जेणेकरून पालिकेची कचरा गाडी येताच त्यात कचरा टाका उघडय़ावर कचरा टाकू नका, दंड केला जाईल, असे सांगण्यात आले. तसेच त्यांच्याकडे गोडोली नाका येथे पडलेल्या कच्रयाबाबतही त्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
नागरिकांनी थेट संपर्क साधावा
शहरात कोणत्याही वार्डात वीज, पाणी, गटर याची कसलीही समस्या असल्यास नागरिकांनी थेट संकोच न बाळगता माझ्याकडे तक्रार करावी, त्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल, असे आवाहन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.