वार्ताहर / नीलेश सुर्वे तवसाळ, गुहागर
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसुन येत आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तौत्के वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जोरदार वारे तसेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक परप्रांतीय मच्छीमार नौकाही संकटात आल्या आहेत. हे वादळ अरबी समुद्रात घोंघावत असताना अनेक परप्रांतीय मच्छीमार नौका आता कोकण किनारपट्टी भागात आश्रयाला आल्या आहेत. तौत्के वादळापासुन सुरक्षित राहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह परराज्यातील मच्छीमार नौका जयगड खाडीत आल्या आहेत.