एक गरीब ब्राह्मण होता. दुष्काळ पडला होता. आठ दिवसात त्याला काही खायला मिळाले नव्हते. कोणीतरी त्याला एक मडके भरून सातुचे पीठ दिले. तो स्वयंपाक करायला घेणार एवढय़ात तिथे एक अतिथी एाला. ब्राह्मणाने त्यातले अर्धे पीठ अतिथीला दिले. ही बोधकथा बऱयाच जणांनी वाचली, ऐकली असेल. भारतीय संस्कृतीत ‘अतिथी देवो भव।’ असे म्हटले जाते. म्हणूनच एखाद्या माणसाचा स्वयंपाक जास्त करून ठेवायची पूर्वी पद्धत होती. अचानक कोणी आला तर विन्मुख जाऊ नये, हीच त्यामागील भावना. आपल्या घासातला घास काढून दुसऱयाला देणे हीच संस्कृती. तिथे गरीब श्रीमंत हा भेदभाव नाही. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून त्यागाचे, दानाचे संस्कार होत असतात.
आजकालच्या एकुलत्या एक अपत्यावरही असे संस्कार झाले पाहिजेत. पण बऱयाच वेळा ते झालेले दिसत नाहीत. आईबाप आपल्या लाडक्मया अपत्याला ते म्हणेल ती वस्तू त्याच्या पुढय़ात हजर करतात. पण ती वस्तू दुसऱयालाही पहायला, वापरायला किंवा खाण्यासाठी असेल, तर खायलाही द्यायची सवय बालपणीच लावायला हवी. नाहीतर ही मुले आत्मकेंद्रित, स्वार्थी होतात. त्यांना कोणतीही वस्तू ‘शेअर’ करायला आवडत नाही. पुढे जाऊन मोठेपणी त्याचा त्रास त्याच्या पालकांनाही होऊ शकतो. म्हणून थोडासा त्याग दुसऱयासाठी करण्याची सवय बालपणीच लावली पाहिजे. हे सांगणारा एक श्लोक संस्कृतमध्ये आहे.
त्याग एको गुणः श्लाघ्यः किमन्यैर्गुणराशिभिः।
त्यागाज्जगति पूज्यन्ते पशुपाषाणपादपाः।।
अर्थः- इतर अन्य गुणांच्या राशींपेक्षाही त्याग हा एकच गुण प्रशंसनीय आहे. त्यागामुळेच जगात पशु, पाषाण आणि वृक्ष पूजले जातात. माणसाइतका जगात कोणी स्वार्थी नाही, हे तर सिद्ध झाले आहे. पण निसर्गातील प्रत्येक घटक हा दुसऱयासाठी त्याग करताना दिसतो. पशुंपासून आपल्याला दूध, लोकर, शेण, कातडे इ. मिळते. शेतीसाठी उपयोग होतो, घर राखायला, उंदीर पकडायला, ओझे वहायला, वाहने ओढायला शिवाय माणसाचे पोट भरण्यासाठीमाणूस पशुंचा वापर करतात. पशु त्यासाठी स्वतःचा जीवही देतात. दगड निर्जीव. पण घणाचे घाव सोसून त्यातून सुंदर मूर्ती घडते. सर्वांना आनंद देते. देव म्हणून लोक त्याला पूजतात. पादप म्हणजे झाड. झाडाचा प्रत्येक अवयव दुसऱयासाठीच असतो. थोडक्मयात बारशापासून बाराव्यापर्यंत झाडे उपयोगी पडतात. म्हणूनच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, हेतूने त्यांची पूजा केली जाते. दातृत्व, त्याग हे गुण अशा प्रकारे निसर्ग आपल्याला शिकवतो.
दानं भोगो नाशः तिस्त्राs गतयोः भवन्ति वित्तस्य।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति।।
अर्थः- दान करणे, उपभोग घेणे आणि नष्ट होणे ह्या धनाच्या तीन गती (परिणाम) आहेत. जो दान करीत नाही, उपभोग घेत नाही, त्याच्या धनाची तिसरी गती होते, म्हणजे ते नष्ट होते. ‘तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला’ अशी अवस्था. तात्पर्य काय, तर माणसाने स्वार्थ सोडून परमार्थाचाही विचार करायला हवा. हात सैल सोडायला हवा.
आता थोडे संस्कृत शिकूया?
अतिथीः- इदानीम् मया गन्तव्यम्।(आता मला गेले पाहिजे)
गृहस्थ :-ति÷तु, भोजनं कृत्वा गच्छतु। (थांबा,जेवूनच जा)
अतिथी:- न, इदानीम् भोजनं न करोमि। नको.आता जेवत नाही)
गृहस्थ:-न, भोजनस्य समयः। (नाही. ही जेवणाची वेळ आहे)
अतिथी:-पुनः कदाचित् आगच्छामि। (पुन्हा कधीतरी येईन)