कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत दोन-चार गावे शहरात येतील. ८१ वॉर्डचे १०० वॉर्ड होतील असे हद्दवाडीबद्दल सूतोवाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, नवीन आराखडा रद्द झाल्यानंतर पुन्हा याची रचना होणार आहे. नवीन आराखड्यानुसार ग्रामीण हद्दीतील चार ते पाच गावे शहरांना जोडली जाणार आहेत. असा अंदाज व्यक्त केला. नव्या आराखड्यानुसार महापालिकेतील 81 वॉर्ड वरून 100 वॉर्ड होतील. असा अंदाज देखील पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, हद्दवाढीचे संकेतच पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यातून आल्यानंतर कोल्हापुरात चर्चांना उधाण आले आहे.