प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील दोन महिला अधिकाऱयांच्या या महिन्यात आत्महत्या झाल्या. मुळात त्या खुल्या प्रवर्गातील असल्याने त्यांना वरीष्ठ अधिकाऱयांकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी त्यांचे जीवन संपवले असले तरीही त्यांची आत्महत्या नव्हे तर हत्याच होती अशा भावना सातारा जिल्हावासियांमधून उपस्थित होवू लागल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
दि.6 मार्च रोजी भंडारा जिह्यातील लाखानी येथे महिला बालविकास विभागाच्या अधिकारी शीतल फाळके यांनी घरातच आत्महत्या केली. त्यांच्यासोबत त्यांच्या आई रहात होत्या. त्यांनाही वरीष्ठ कार्यालयाकडून त्रास होत होता. त्याही सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील. त्या खुल्या प्रवर्गातून स्वतः हुशारीवर पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवेचे महिला बालविकास अधिकारी म्हणून पद मिळवले होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर आईने त्यांचा सांभाळ केला होता. तसेच नुकतीच दीपाली चव्हाण यांच्याबाबतीत वरीष्ठ अधिकारी शिवकुमार हा ऍट्रोसिटीची भिती दाखवून त्यांच्याकडून चुकीची कामे करवून घेत होता. त्याच्या त्रासामुळे त्यांनी वैतागुन आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार तिच्या चिठ्ठीतून उघडकीस आला आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांचे साताऱयातल्या व्यंकटपूरा पेठेशी नाते असल्याने हळहळ व्यक्त होत असून त्या दोघींच्या आत्महत्या नव्हे तर वरीष्ठांच्या त्रासामुळे हत्याच आहेत. जे दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, संबंधितांना शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त होवू लागली आहे.
राजकारण बाजूला ठेवा
दीपाली चव्हाण यांच्या चिठ्ठीत खासदार नवनीत राणा यांच्याकडे तक्रार केल्याचा मुद्दा आता राजकीय बनू लागला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर आरोप केला आहे. वास्तविक राजकारण बाजूला ठेवून शासकीय कार्यालयामध्ये ठराविक समाजाच्या महिलांना टार्गेट करण्याचे जे प्रस्त वाढले आहे. त्या विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे. ठराविक जातीचे पालख्या घेवून नाचणाऱया भोयांना महिलांचा शासकीय कार्यालयात छळ होत असल्याचे दिसत नाही का?, असाही सवाल सर्वसामान्यांना उपस्थित होवू लागला आहे.