सावंतवाडी/प्रतिनिधी-
तळकट येथील वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेत माती उत्खनन करुन बंधारा बांधला जात आहे. याठिकाणी पाणी नसताना हा बंधारा बांधला जात आहे. पाणी नसताना बंधारयावर पैसा खर्च करण्याचे वनखात्याचे प्रयोजन काय असा सवाल व्यक्त होत आहे. वनखात्याच्या हददीतुन रस्ता जात असेलतर डांबरीकरण, खडीकरण करायचे असल्यास वनखाते पर्यावरणाचे कारण दाखवुन अडवणुक करते. तळकट -कुंभवडे रस्त्यावर तीन किमी रस्ता वनखात्याच्या हददीतुन जातो. हा रस्ता वनखात्याचे जंगल अस्तीत्वात येण्यापुवीचा आहे. याठिकाणी खडीकरण, डांबरीकरण करण्यास वनखाते आडकाठी करते. ग्रामस्थांनी उपोषणही केले. परंतु वनखाते पर्यावरणाचे कारण देते. तळकट येथे बंधारयासाठी केलेले उत्खनन पर्यावरणाचे हानी करणारे नाही काय असा सवाल व्यक्त होत आहे.