जिल्हाधिकाऱयांकडून पोलीस अधिकाऱयांना पत्र
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळय़ा घाला असे वक्तव्य करणाऱया भीमाशंकर याच्यावर कारवाई करा, असे जिल्हाधिकाऱयांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी हे पत्र पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविले आहे.
बेळगावची शांतता भंग व्हायला कणसेचा भीमाशंकर हाच काणीभूत आहे. त्याच्या या व्यक्तव्यानंतर सीमाभागाबरोबरच महाराष्ट्रातही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गोळय़ा घाला म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. म. ए. समितीच्या नेत्यांनी राकसकोप जलाशयात विष कालवून कन्नड लोकांना मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्याने केला होता. याचबरोबर सार्वजनिक संपत्तीचे नुकसानही समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे, अशा पध्दतीने समितीच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषदेत गरळ ओकली होती.
या त्याच्या वक्तव्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले. त्यानंतर म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून भीमाशंकरवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याच्यावर कारवाई तातडीने करणे गरजेचे होते. आता जिल्हाधिकाऱयांनी त्याच्यावर कारवाई करा, असे पोलिसांना आदेश दिले आहेत. निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी स्वतःच्या सहीने पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुख यांना पत्रे पाठविली आहेत. भीमाशंकर याच्या आरोपाची चाचपणी करुन त्यानंतर कारवाई करा, असे या पत्रात म्हटले आहे.