ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल सायंकाळपासून चकमक सुरू आहे.या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
पुलवामाच्या अवंतीपुरा क्षेत्रातील त्रालमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून जम्मू पोलीस, 42 आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहेत.