वातावरणात गारठा : उबदार कपडय़ांच्या मागणीत वाढ : नागरिकांचा ब्लँकेट खरेदीकडेही कल
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून किमान तापमाणात घट होत असून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उबदार कपडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात सकाळी आणि रात्री गारठा वाढू लागला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.
मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पहाटेच्या वेळी धुक्मयाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जॅकेट्स, कानटोप्या व इतर उबदार कपडय़ांची मागणी वाढली आहे. पहाटे वातावरणात गारठा निर्माण होत असल्याने पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱया नागरिकांवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. मागील दोन दिवसात ढगाळ वातावरण आणि अधुनमधून केवळ पावसाचा शिडकावा यामुळे गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढले आहेत.
थंडीची चाहूल लागताच अनेकांनी उबदार कपडे कपाटातून बाहेर काढले आहेत. रंगीबेरंगी उबदार स्वेटर आणि जॅकेटांचीही खरेदी सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे. साधारण 300 ते 700 रुपयांपर्यंत आकारमानानुसार जॅकेट्स आणि स्वेटर्सची विक्री सुरू आहे. 70 ते 180 रुपयांपर्यंत कानटोप्या विक्री केल्या जात आहेत. तसेच लहान मुलांचे उबदार कपडेदेखील उपलब्ध आहेत. याबरोबरच काही नागरिक ब्लँकेट खरेदीलाही पसंती देत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि वाढलेल्या थंडीमुळे उबदार कपडय़ांना मागणी वाढली आहे.