प्रतिनिधी / कोल्हापूर
वीज बिलाची वसुली करताना, थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये, अशा सुचना महावितरण कंपनीला द्याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-व्यवसाय बुडाले, अनेकांची नोकरी गेली. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आर्थिक अडचणीत आहेत. आर्थिक अडचणींवर मात करीत, जनजीवन पुर्वपदावर यावे यासाठी प्रयत्न करणाऱया नागरिकांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे.
लॉकडाऊच्या काळातील व्यावसायिक, औद्योगीक वीज ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करण्याचे व घरगुती वीज बिल माफ करण्याचे आपल्या महाविकास आघाडी सरकारने जाहिर केले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी वीज प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. तरी लॉकडाऊन काळातील औद्योगीक वीज ग्राहाकांचे स्थिर आकार रदद करणे व घरगुती वीज बिल माफ करण्याबाबतचा निर्णय होईपर्यत थकबाकीदार वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये, याबाबतचे आदेश संबंधीत यंत्रणेला देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार जाधव यांनी निवेदनात केली आहे.
Previous Articleगोकुळचा उद्या 58 वा वर्धापन दिन
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.