कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल ठप्प
शेतकरी आद्याप 50 हजार रूपये अनुदानाच्या प्रतिक्षेत
80 टक्के शेतकरी नियमित कर्ज फेडणारे
सागर लोहार / व्हनाळी
शासनाने ज्या शेतकऱ्यांचे थकित कर्ज आहे त्यांना दोन लाख रूपयापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. पण जो शेतकरी दरवर्षी गावातील विकास सेवा सोसायट्याकडून कर्जे घेतो आणि त्या कर्जाची वेळेत परतफेड करतो. अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याचाही विचार करून त्यांना सरकारने ५० हजार रूपयापर्यंतची मदत जाहीर केली आहे. पण, प्रत्यक्षात मात्र त्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही आहे त्यामूळे हे ५० हजार रूपये अनुदान मिळणार कधी याची प्रतिक्षा बळीराजाला लागून राहिली आहे.
प्रत्येक गावागावातील सुमारे ८० टक्के शेतकरी हे नियमित कर्जफेड करणारे आहेत. नियमित कर्जफेड करणारा शेतकरी कर्जफेडीच्यावेळी त्याच्या समोर असणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करत तो प्रसंगी आपल्या पत्नीचे दाग-दागिने बॅंकेमध्ये गहाण ठेऊन सेवा सोसायटीची कर्जफेड करतो आणि ती फेड झाल्यावर नवीन कर्जाची मागणी करून परत लोकांची देणी भागवतो असे दरवर्षी शेतीच्या आधारावर संसार चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रासायनिक खते, औषधे, बियाणे, मशागतीचे वाढलेले प्रचंड दर या विचार करता आजच्या या महागाईच्या काळात त्याच्या ऊसाला मिळणारे तीन हजार रूपये प्रतिटन दराने येणारे पैसेसुद्धा त्याच्या वर्षभराच्या खर्चाला पुरे होऊ शकत नाहीत. त्यातच नवीन निर्माण होणाऱ्या गरजासाठी दुसरीकडून पैशाची जुळवाजुळव करावी लागते. यामूळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक अवस्थाही वाईटच आहे. थकबाकीदार शेतकऱ्याच्या बरोबरीने शासनाने त्या शेतकऱ्यालाही ५० हजार रूपये मदत जाहीर करून न्याय दिला पण प्रत्यक्षात मात्र ही रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा कधी होणार उलट ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांना जुने कर्ज माफ होऊन नवीन कर्ज घेण्यास तयार आहे. पण नियमित कर्जफेड करणारा शेतक-याला जुने कर्जाची फरतफेड झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नाही. तसेच सरकारची शेतक-यांविषयी असणारी उदिशिनता व निसर्गाचा नुकसानिचा कहर या दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.
शेतकरी आशेवरच….
गेल्या अनेक वर्षापासुन शेतकऱ्यांना विविध योजना देण्याची घोषणा होते. पण प्रत्यक्षात मिळणारा लाभ हा प्रामाणिक शेतकऱ्यांना कधी मिळतच नाही त्यामुळे कर्जमाफी, शेती पिके, घरांच्या पडझडींची मुकसानभरपाई फक्त कांही शेतकऱ्यांनाच मिळते त्यामुळे उपेक्षित गरीब शेतकरी मात्र फक्त आशेवर अवलंबुन राहण्याशिवाय दुसरा मार्गच नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीच निराशा पहायाला मिळते.
थकीत तुपाशी तर परतफेड करणारे उपाशी….
नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने पन्नास हजार रूपये अनुदानाची घोषणा केली. प्रामाणिक शेतकऱ्यांनी अंगावरील कर्जाचा बोजा खांद्यावर करून कर्जाची परतफेड केली. पण प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नाही. परंतू यांच्या तुलनेत शकबाकीदार शेतकरी आपले थकीत कर्जाचे शासनाकडील सुट घेवून नवीन कर्ज घेतले. मात्र परतफेड करणारे शेतकरी कर्जापासून वंचीत राहिले. यामुळे थकीत शेतकरी तुपाशी पण परतफेड करणारा उपाशी आशी आवस्था झाली आहे.