थेम्सच्या तीरावरच्या एका गृहस्थाच्या तोंडावरच्या मास्कसह किनाऱयावर दोघे बसले होते.
“तू माझं ऐकायला हवंस. किती केलं तरी मी तुझा मोठा भाऊ आहे.’’
“मी तुझं सगळं ऐकेन. पण आधी हे मोठा भाऊ लहान भाऊ वगैरे भावनिक बोलणं सोडून दे हं. गेल्या वषी भारतातली एक युती अशीच मोडली. युतीत दोनच मित्रपक्ष होते. कधी हा स्वतःला मोठा भाऊ म्हणायचा, तर कधी तो.’’
“माफ कर, पण मला राजकारणातलं काही समजत नाही.’’
“तू वर्षभर त्या देशात होतास. यशस्वी होऊन आलास की नाही?’’
“वर्षभर होतो. नुसताच देशात नव्हतो, लोकांच्या शरीरात होतो, रुग्णालयात होतो, डॉक्टर आणि नर्सेसच्या अंगावरच्या पीपीई किट्समध्ये होतो. वर्तमानपत्रात, टीव्हीवर आणि समाजमाध्यमात होतो. धम्माल आली.’’
“कसली धम्माल?’’
“तिकडे सगळी धम्मालच आहे. त्यांच्याकडे लोकशाही आहे. पण सरकारवर कोणी टीका केली की त्याला देशद्रोही म्हणतात. व्हॉट्सअप हे तिथले एकमेव मुक्त, मुख्य विद्यापीठ झाले आहे. व्हॉट्सअप तिथल्या बहुसंख्याकांचा धर्मग्रंथ झाला आहे. अखेरचा शब्द झाला आहे. लोक कोणत्याही प्रश्नाचे उत्तर व्हॉट्सअपवर शोधतात. तिथे जे लिहिलेले असेल ते खरे मानतात. व्हॉट्सअपच्या खालोखाल टीआरपीप्रेमी वाहिन्यांवर त्यांचा विश्वास असतो. अँकरने जोरात किंचाळून खोटी बातमी सांगितली तरी त्यांना ती खरी वाटते.’’
“मज्जा आहे बुवा. वर्षभर तू मजा केलीस. आता मलाही जावंसं वाटतंय.’’ “आवश्य जा. तुला भरपूर गिऱहाईके मिळतील. अरे मी तिथे वर्षभर धुडगूस घालत होतो. गर्दी दिसली की हल्ला करून बळी टिपत होतो. पण तरी ते बिनधास्त गर्दी करून हिंडत होते. सरकारने नाकावर लावायला सांगितलेला मास्क हनुवटीवर लावून फिरत होते. त्यांना नीट मास्क लावायला भाग पाडण्याची जबाबदारी सरकारने वाहतूक पोलिसांवर सोपवली. मग काय… विचारू नकोस. तिथले काही पुढारी मात्र आपल्या बाजूचे निघाले. लोकांना सण-उत्सव-उरूस साजरे करण्यासाठी, यात्रेला जाण्यासाठी, वारीला जाण्यासाठी, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी सतत चिथावणी देत होते.’’
“पण इतक्या दूरचा प्रवास मी कसा करू?’’
“मी तात्यांबरोबर विमानात बसून गेलो होतो. तू बोरिसदादाबरोबर विमानात बसून जा.