कर्जत/प्रतिनिधी
नगर: अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. सुजय विखे-पाटील कधी राजकीय भाष्य करताना दिसत नाहीत. त्यांनी पहिल्यांदाच त्यांनी राजकीय भाष्य केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील एका कार्यक्रमात हा दावा केला. त्यांनी अकार्यकर्त्यांना संबोधित करताना थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मात्र लगेचच त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केल्याचा म्हणत त्यांनी अशी सारवासारव केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते कर्जत दौऱ्यावर होते. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलतांना दिवाळी नंतर राज्यात भाजप सरकार येईल असा दावा केला होता.