जीव धोक्यात घालून कोरोना विरूद्ध लढाई सुरू, विमा संरक्षण देण्याची मागणी
अरूण तळेकर / बाजारभोगाव
गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावोगावी कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांना त्यांच्या घरी जावून कोवीड सेंटरमध्ये पाठवणे, प्रथम संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करणे, संपूर्ण परिसर, गाव सॅनिटाईझ करणे, परगावहून येणाऱया नागरिकांची स्वतंत्र व्यवस्था करणे अशी जोखमीची कामे या समितीने केली आहेत. जीव धोक्यात घालून हे काम आत्ता कोरोनाच्या दुसऱया लाटेतही सुरू आहे. परंतु गावचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणारी ही समितीच असुरक्षित आहे.
गतवर्षी सरपंचांना जाहीर केलेल्या विमा संरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे कोरोनाकाळात जीव गमावलेल्या सरपंचांची कुटुंब उघडÎावर पडली आहेत. कोरोना काळात प्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱया सरपंचांबरोबर उपसरपंच व दक्षता समितीतील इतर सदस्यांनाही शासनाने तात्काळ विमा संरक्षण देवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा या दक्षता समितीत समावेश आहे. अगदी घरोघरी जावून आरोग्य तपासणी व प्रबोधन करण्याचं काम या समितीने केले आहे. गतवर्षी लॉकडाऊन जाहीर होताच पुणे, मुंबईसह अनेक शहरात कामासाठी गेलेले नागरिक गावी परतले. त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांची संपूर्ण व्यवस्था करताना या दक्षता समितीला तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक वादाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. गतवर्षी शासनाने सरपंचांना पन्नास लाखांचे विमा संरक्षण जाहीर केले. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या सरपंचांची कुटुंबं उघडÎावर पडली आहेत. पन्हाळा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व बाजारभोगावचे लोकनियुक्त सरपंच नितीन पाटील यांचा गतवर्षी कोरोनाकाळात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने एक रूपयाचीही मदत केलेली नाही. त्यामुळे जोखीम पत्करून काम करायचे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गतवर्षी कोरोबाधित रूग्ण आढळल्यास त्याला ने-आण करण्यासाठी शासनाच्यावतीने ऍब्युलन्स, एस.टी. बसची व्यवस्था केली गेली होती. कोवीड सेंटरमध्येही चांगली व्यवस्था होती. होम क्वारंटाईन रूग्णांवर लक्ष दिले जायचे. पण आत्ता कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी मात्र वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. कोरोना चाचणीसाठी नागरिकांना स्वखर्चाने जावे लागत आहे. त्यामुळे चाचणीबाबत उदासिनता असून दक्षता समिती व नागरिकांमधील वादात भर पडली आहे. गतवर्षी आमच्या घरी एक रूग्ण सापडला तर सर्वांना गाडीत बसवून कोवीड सेंटरमध्ये नेलत. मग आत्ता एका घरात कितीही रूग्ण सापडले तरी इतरांना का सूट दिली जातेय. त्यांच्यावर का बळजबरी केली जात नाही. असे वाद वारंवार होताना दिसत आहेत. दक्षता समितीला गावात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी घर टू घर सर्व्हे करण्यावर दक्षता समितीने भर दिला आहे. घरोघरी जावून प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात आहे. याशिवाय लसीकरणासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. लसीकरणासाठी कँम्प आयोजन करण्यासाठीही दक्षता समिती पुढाकार घेत आहे.
यापुढे कोरोनाची तीसरी लाट येणार आहे. ही लाट भयंकर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यासाठी दक्षता समितीने सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे. मात्र सरपंच, उपसरपंच व दक्षता समितीचे प्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱया सदस्यांना वाऱयावर सोडले आहे. कोणताही मोबदला न घेता केवळ जनसेवा म्हणून हे कार्य आजपर्यंत केले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित विमा संरक्षण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा जीव धोक्यात घालून सुरू असणारे काम थांबवावे लागेल, असा इशारा पश्चिम पन्हाळ्यातील सरपंच, उपसरपंच व दक्षता समितीच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे.
गावात कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी माझ्यासह दक्षता समितीतील सर्वच जण दररोज परिश्रम घेत असतात. गतवर्षी सरपंच नितीन पाटील यांना कोरोनाकाळात जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांना कसलीही शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्ही मानधन मागत नाही. परंतु जोखीम पत्करून सुरू असलेल्या कामाची दखल घेवून विमा संरक्षण देण्याची गरज आहे. अन्यथा या कामाबाबत आम्हाला फेरविचार करावा लागेल.
– बाबासो खोत, सरपंच बाजारभोगाव
सरपंचांसह इतरांच्या खांद्याला खांदा लावून, जीव धोक्यात घालून उपसरपंच व सदस्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे दक्षता समितीतील प्रत्येकाला विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. – रोहन कातळे, उपसरपंच पाटपन्हाळा