माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी गावोगावी मतदारांशी साधला संवाद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने प्रचाराचा झंझावत सुरूच ठेवला आहे. माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे हे ठाण मांडून आहेत. त्यांनी शुक्रवारी दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर, धामणे, राजहंसगड, सुळगा, देसूर, नंदिहळ्ळी या परिसरात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आर. व्ही. देशपांडे यांनी राजहंसगडावर भेट देऊन श्री सिद्धेश्वरच्या मंदिरात जावून पूजा करून प्रचाराला सुरुवात केली.
भाजपने सर्व जनतेची दिशाभूल केली आहे. महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. काँग्रेसचे पहिलाचे दिवस आठवा आणि भाजपला हिसका दाखवत काँग्रेसला मदत करा, असे आवाहन आर. व्ही. देशपांडे यांनी केले आहे. येळ्ळूर गावातील अनेक गल्ल्यांमध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला. याचबरोबर काँग्रेस पक्ष कसा काम करत असतो याची माहिती दिली आहे.
येळ्ळूरनंतर सुळगा, राजहंसगड, नंदिहळ्ळी, देसूर या ठिकाणी जाऊन प्रचार केला आहे. भर उन्हामध्येही त्यांनी प्रचार केला असून काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. भाजप हा केवळ हिंदुत्वाचा नारा देतो. मात्र हिंदूच नाही तर देशातील गोर-गरीब जनतेची फसवणूक केली आहे. केवळ आश्वासने देणे याव्यतीरिक्त भाजपने काहीच केले नाही. असा आरोप देखील आर. व्ही. देशपांडे यांनी केला आहे.
प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन विनंती केली आहे. काँग्रेसने यावेळी एक निर्धार केला आहे. यावेळी मतदार राजावरच अवलंबून आहे. तुम्ही आमच्या पाठिशी ठामपणे रहा आम्ही सर्वसामान्य जनतेला निश्चितच त्याचा फायदा मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. या प्रचारादरम्यान जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, किरण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.