दरवर्षी स्टार्टअप्सच्या संख्येत 10 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ गुरगाव
दरवषी स्टार्टअप्सची संख्या दहा टक्क्मयांनी वाढत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. देशामध्ये स्टार्टअप कंपन्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून या कारणास्तव कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे सरकारने सांगितले आहे.
सदरची संख्या वाढण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दर वर्षी भारतातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या ही दहा टक्क्मयांच्या आसपास वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. यातील अनेक कंपन्या या ऍप्लीकेशनच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. संपूर्ण जगाचा विचार करता भारत हा स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये तिसऱया नंबरचा देश ठरला आहे.
14 हजार कंपन्या
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील नव्या स्टार्टअप कंपन्यांची संख्या वाढून 14 हजाराहून अधिक झाली आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये त्यांची संख्या 733 इतकी होती.
युनिकॉर्न संख्या 83 वर
2021 मध्ये 44 भारतीय स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्नचा दर्जा मिळाला आहे. ज्यांचे बाजारमूल्य एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. देशातील युनिकॉर्नची संख्या आता 83 झाली आहे.
14 लाख जणांना रोजगार
दरम्यान स्टार्टअप कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळवून देण्यात आघाडी घेतली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जवळपास 14 लाख लोकांना नोकऱया उपलब्ध झाल्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.