ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुरु गोविंद सिंग यांच्या चार मुलांना श्रद्धांजली म्हणून देशात दरवर्षी 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रकाश पर्वानिमित्त 10 वे शीख गुरु गोविंद सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते म्हणाले, गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या चार साहिबजाद्यांचे शौर्य भारतातील कोटय़वधी लोकांना धैर्य देते. ही थोर माणसे अन्यायापुढे कधी झुकली नाहीत. साहिबजादे जोरावर सिंग आणि साहिबजादे फतेह सिंग यांनी धर्माच्या महान तत्त्वांना बळी पडण्याऐवजी मृत्यूची निवड केली. त्यांना भिंतीत जिवंत गाडण्यात आले. त्यांचे जीवन आणि संदेश लाखो लोकांना शक्ती देते. त्यांची आठवण म्हणून भारत दरवषी 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करेल.
गुरु गोविंद सिंग यांची 350 वी जयंती साजरी करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली, याचा मला नेहमीच आनंद वाटत राहील, असेही मोदींनी यावेळी सांगितले.