प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. कर्नाटकात दलितांवर अन्याय होऊनही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया सरकारने दिलेली नाही. अत्याचार करणाऱयांवरही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकरीविरोधी व दलितविरोधी सरकारचा आम्ही विरोध सुरूच ठेवणार, अशी माहिती कर्नाटक दलित संघर्ष समितीचे राज्य समन्वयक मावली शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोणालाही विश्वासात न घेता राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू केला. परंतु या कायद्याचा नेमका फायदा कोणाला झाला? याचा फायदा ना गुरे बाळगणाऱया शेतकऱयाला ना इतरांना झाला आहे. केवळ मते मिळविण्यासाठी काही वर्गाला खूष करण्यासाठी असे कायदे लागू करण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्र वाढविण्यासाठी नवीन कृषी कायदे लागू करण्यात येत आहेत. परंतु याला आमचा विरोध असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य गौतम पाटील, जिल्हा समन्वयक सिद्धाप्पा कांबळे उपस्थित होते.