टेलिव्हिजन क्षेत्रात दर्जेदार मालिका आणि मोठय़ा पडद्यावर घंटा, मुरांबा अशा यशस्वी चित्रपटाची निर्मिती करणारी दशमी टीम, भाऊबळी या नव्याकोऱया चित्रपटाद्वारे नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करत आहे.
जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या पुरस्कार विजेत्या कथासंग्रहातील 672 रुपयांचा सवाल, अर्थात युद्ध आमुचे सुरू…! या कथेवर आधारित समीर पाटील दिग्दर्शित भाऊबळी या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. मेरे साई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा या मालिकांची यशस्वी निर्मिती करत महान व्यक्तिमत्वांचे चरित्रपट छोटय़ा पडद्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य दशमीचे नितिन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगांवकर हे त्रिकुट करत आले आहे. नववर्षाची सुरुवात करताना भाऊबळी या चित्रपटाबरोबरच महाराष्ट्राबरोबरच देशाला स्त्राr शिक्षण आणि समानतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱया फुले दाम्पत्याची चरित्रगाथा सावित्रीजोती या मालिकेद्वारे ते लोकांसमोर घेऊन येत आहेत. मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना आशयघन कलाकृतींची मेजवानी देखील 2020 च्या निमित्ताने चाखायला मिळणार आहे.