ऑनलाईन टीम / गोरखपूर :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दबदब्यामुळे गोरखपूर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे गोरखपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, अफगानी फियादिनच्या दहशतवाद्यांनी गोरखपूरला लक्ष्य केले आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर, गोरखपुर सह प्रदेशातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन संपूर्ण तयारीत असून कोणत्याही समाजविघातक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.
शहरातील जवळपास 50 स्थळांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली आहे. तसेच भारत-नेपाळ सीमेवर बारीक नजर ठेवून कोणत्याही दहशतवादी हालचालींना आळा घालण्यासाठी अलर्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी होणारे भूमिपूजन ते 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापर्यंत विशेष सतर्कता बाळगली जाणार आहे. ISI आदेशानुसार अफगाण ट्रेंड फियादिन दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.