वार्ताहर/ उचगाव :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचा तृतीय भाषेच्या पेपरने शुक्रवार दि. 3 जुलै रोजी समारोप होणार आहे. तालुक्मयातील 19 परीक्षा केंद्रांवरील सहाही पेपर सुरळीत पार पडल्याने शिक्षण खाते, शासन, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग एका मोठय़ा जबाबदारीतून मुक्त झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
परीक्षेतून मुक्त झाल्यानंतर आता विद्यार्थीवर्गाला हुरहुर आहे ती दहावीच्या निकालाची. कारण येनकेन प्रकारेन परीक्षा घेणार की नाही? की रद्द होणार? या गोंधळात अडकलेले विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. काही पालकांना-विद्यार्थ्यांना वाटायचे परीक्षाच रद्द होऊन पास करावे तर काही हुशार विद्यार्थीवर्गाला आपले प्रथम क्रमांक, उच्चश्रेणीचे निकाल कमी लागतील, याची चिंता होती. मात्र, यातून अखेर परीक्षा पार पडली आणि सर्वांच्यावरील ताण कमी झाला.
स्काऊट अँड गाईड कार्यदर्शींचीपरीक्षा केंद्रांना भेट
स्काऊट अँड गाईडच्या तालुका कार्यदर्शी एस. एल. बंदकन्नावर ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या, बेळगाव तालुक्मयातील 19 परीक्षा केंदे व 4 उपकेंद्रांवर 72 स्काऊट अँड गाईडच्या शिक्षकवर्गाची नेमणूक केली आहे. या सर्वांनी प्रत्येक केंद्रांमध्ये आपले काम चोखपणे पार पाडले आहे. सोशल डिस्टन्सचे पालन केले आहे. तसेच सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोफत मास्क वितरण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रेस मार्क्स देण्याची विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्यादृष्टीने केलेली तयारी, जोश बहुतांश वाया गेला, असे विद्यार्थी व पालकवर्गाचे म्हणणे आहे. यामुळे परीक्षेमध्ये सोडविलेल्या पेपरमध्ये मार्क्सची जी अपेक्षा होती, ती ग्रेस मार्क्सने पूर्ण करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकवर्गातून करण्यात येत आहे.