जिल्हा पंचायत कार्यालयात अधिकाऱयांची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
दहावीचा निकाल वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी यासाठी आतापासूनच नियोजन करावे. विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे आणि दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढवावी, असे प्रांताधिकारी अशोक तेली यांनी सांगितले. दहावी परीक्षासंदर्भात जिल्हा पंचायतमध्ये शिक्षण अधिकाऱयांची तसेच तालुका पंचायतीच्या अधिकाऱयांनी संयुक्तरित्या बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, शाळेच्या परिसरात वनीकरण करावे, ज्या शाळांच्या परिसरात अधिक जागा आहे त्या ठिकाणी भाजीपाला तसेच इतर बागायत करावी, अशी सूचना देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अधिक काळजी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीमध्ये तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, गटशिक्षणाधिकारी रुद्रगौडा जुटण्णावर, रवी बजंत्री, राजू गुंगवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.