शिक्षण विभागाकडून योग्य नियोजन : काठिण्य पातळी कमी ठेवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीच्या परीक्षांना सोमवार दि. 28 पासून प्रारंभ होत आहे. परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरे जावे, असे मार्गदर्शन शिक्षकांकडून केले जात आहे. यावषी परीक्षेत काठिण्य पातळी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षा न दिल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दहावी हा शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिला जातो. दहावीच्या गुणांवर पुढील शिक्षणाचा पाया अवलंबलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी काही दिवसांपासून दहावीच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षा भीतीपूर्ण वातावरणात घेण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी मात्र शिक्षण विभागाने योग्य पद्धतीने परीक्षेचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही भीतीखाली परीक्षांना सामोरे न जाता आत्मविश्वासाने परीक्षा द्यायची आहे.
विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत शुभेच्छा
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पालक, नातेवाईक, मित्रमंडळींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. फोन अथवा मेसेज करून या शुभेच्छा देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची ही एकप्रकारे परीक्षाच असल्याने विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जात आहे. शिक्षण विभागाकडून यावर्षी दहावीच्या परीक्षेची काठिण्य पातळी कमी करण्यात आली आहे.
सध्या दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांत कोरोनामुळे परीक्षा देण्यात आलेली नसल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेषात वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सोयिस्कर व्हावे याकरिता परिवहनने ही व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र दाखवून विनातिकीट प्रवास करता येणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना बसचालक व वाहकांना केल्या आहेत.