गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांचे मुख्याध्यापकांच्या बैठकीत आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
जर शिक्षकांनी मनात आणले तर येत्या दहावीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकतील. परंतु त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी केले.
उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या सभागृहात बेळगाव शहरातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थी 8 वी ते 10 वी अशी तीन वर्षे हायस्कूलमध्ये शिकत असतो. परंतु या तीन वर्षात 35 गुण मिळविणे हे अशक्मय नाही. यासाठी प्रत्येक विषय शिक्षकांनी तयारी करून घेणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी आठवडय़ाला किमान 12 तासिका व विषय शिक्षक प्रामाणिकपणे शिकवत असतील तर सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
एसएसएलसीचे जिल्हा नोडल अधिकारी एन. आर पाटील, मुख्याध्यापक इरय्या हिरेमठ, के. के. चांदवाले, एस. एम. बड्डूर, एस. एन. अक्की यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण संयोजक गीता तिगडी, परवीन नदाफ, बी. सी. मुदकन, बी. बी. नरसण्णावर, एस. जी. पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. के. मादार यांनी स्वागत केले. सरस्वती देसाई यांनी सूत्रसंचालन केले.