प्रतिनिधी/ सातारा
शालेय शैक्षणिक जीवनात अत्त्यंत महत्वाची मानली जाणारी इयत्ता 10 वी च्या लेखी परिक्षेस आजपासुन प्रारंभ होत आहे. ही परिक्षा येत्या दि. 4 एप्रिल पर्यंत जिल्हय़ातील विविध केंद्रांमध्ये पार पडणार आहे. यंदाची परिक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत शाशंकता होती, पण शिक्षण विभाग आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदाची ही परिक्षा ऑफलाईन घेण्यावर शिक्का मोर्तब झाला, आणि त्यानुसार आज विविध केंद्रावर पहिला पेपर पार पडणार आहे.
जिल्हय़ात एकुण 39 हजार 903 विद्यार्थी ही परिक्षा देणार असुन एकुण 763 केंद्रांवर ही परिक्षा पार पडणार आहे. दहावीची एकुण मुळ केंद्रे 116 होती पण ‘शाळा तेथे परिक्षा केंद्र’ या धोरणानुसार 647 उपकेंद्रांची यंदा नव्याने भर पडली आहे. सध्या जिल्हय़ात दहावीची 15 पेक्षा कमी पट असणाऱया 65 शाळा असुन या शाळेतील विद्यार्थ्यांची परिक्षा ही मुळ परिक्षा केंद्रातच होणार आहे. त्यामुळे यंदा परिक्षा केंद्रांची संख्या वाढल्यामुळे शिक्षणविभागाच्या कामकाजामध्ये ही अधिकच भर झाली आहे.
त्यातच कॉपी प्रकारांना आळा घालण्यासाठी 7 भरारी पथकांची स्थापना ही करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, निरंतर शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्यखता डाएट, महिला पथक अशी 7 पथके परिक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. 116 केंद्राना 116 मुख्य केंद्र संचालक, 647 उपकेंद्रांना 647 उपकेंद्र संचालक, 25 विद्यार्थी संख्येला 1 पर्यवेक्षक, शिपाई, लेखनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपरची ने आण करण्यासाठी रनर, कस्टेडीयन, सहाय्यक कस्टेडीयन आदींची नेमणुक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहाय्यक कस्टेडियन मुख्य केंद्रांवर व रनर उपकेंद्रांवर पूर्ण वेळ थांबून बैठे पथक म्हणून काम करणार आहेत. सर्व केंद्र व उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था, पुरेसे साहित्य व इतर सुविधा लाईट पाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व परिक्षा केंद्रांवर 144 कलम लागु करण्यात आले असुन, चोख पोलिस बंदोबस्त ही करण्यात आला आहे.
ऑल दि बेस्ट
मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली आहे, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे परिक्षा या ऑफलाईनच होणार असा अनेक विद्यार्थ्यांमध्ये सजम होता. पण परिक्षा मात्र ऑफलाईन घेण्याचे जाहीर होताच काही विद्यार्थी निराश झाले होते. पण मनात कोणतीही निराशा न बाळगता अत्त्यंत धैर्याने व बुध्दीचा वापर करत परिक्षेला सामोरे जा! यश हे नक्की तुम्हाला मिळेल. दै. तरूण भारत तर्फे सर्व विद्यार्थ्यांना ‘ऑल दि बेस्ट’