उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
बाहेरच्या जिह्यातून आलेल्या व्यक्तींना 10 दिवसांचे अलगीकरण म्हणजे क्वारंटाईन आवश्यक आहे. ग्रामकृती दलाकडे अशा व्यक्तींवर नजर ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. हे शासकीय धोरण ई-पास तरतूद रद्द झाली तरी कायम राहील, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी दिली. यापुर्वी आरोग्य विभागाने लक्षणे आढळली तरच क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्या म्हणाल्या, परजिह्यातून येणाऱया व्यक्तींवर ग्रामकृती दलाची नजर राहणार आहे. ग्रामकृती दलाचे सदस्य परजिह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती ठेवतील. अशा व्यक्तींना 10 दिवस अलगीकरण म्हणजे क्वारंटाईनमध्ये घालवावा लागेल. या लोकांना कोणताही आरोग्याचा त्रास सुरु झाल्यास आरोग्य सेवक मदत करतील. जरूर तर अशा लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा अन्य ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतील.
परजिह्यातून येणाऱया लोकांना ई-पासची तरतूद सरकारने रद्द केली आहे. अनेक लोक आपल्या सोयीप्रमाणे एका जिह्यातून दुसऱया जिह्यात जात असतात. त्यांनी हा प्रवास केल्यानंतर अलगीकृत राहणे अपेक्षित आहे. सरकारने घालून दिलेल्या निर्देशांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याची कठोर अंमलबजावणी ग्राम कृतीदल नक्की करेल. ग्राम कृतीदलाच्या कामामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.
संभ्रम कायम
परजिल्हय़ातून येणाऱया नागरिकांना थेट क्वारंटाईन न करता त्यांचे स्क्रिनींग केले जाईल. लक्षणे आढळली तरच त्यांना क्वारंटाईन केले जाईल अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सका डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली होती. त्याच्या दुसऱया दिवशी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी 10 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाच्याच दोन यंत्रणांकडून मिळालेल्या या वेगवेगळय़ा माहितीमुळे संभ्रम वाढला आहे. याबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.