अब्दुर रहीम अजमल यांचे विधान- विहिंपकडून टीकास्त्र
आसाममध्ये काँग्रेसचा सहकारी पक्ष एआययुडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या विचित्र विधानानंतर त्यांचे पुत्र अब्दुर रहीम अजमल यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. आसाममध्ये पुढील सरकार चालविणारे दाढी, टोपी आणि लुंगी घालणारे असतील असे अजमल यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर विश्व हिंदू परिषदेने टीका करत याला देशविरोधी मानसिकता ठरविले आहे.
भवानीपूरच्या बजाली येथे सभेला संबोधित करताना अजमल यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. अजमल यांनी मांडलेली वेशभूषा ही आसाममध्ये बंगाली भाषिक मुस्लिमांची असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मानणे आहे. आसाममध्ये स्थलांतरितांचा मुद्दा सर्वात मोठा आहे.
अब्दुर रहमान अजमल यांनी स्वतःची देशविरोधी मानसिकता उघड केली आहे. आसाममध्ये केवळ मुस्लिमच मुख्यमंत्री होणार असल्याचे अजमल यांनी निश्चित केले आहे. अजमल बुरख्यापासून मुक्तीबद्दल बोलणार नाहीत हे आसामची जनता चांगल्याप्रकारे ओळखून आहे. आसामच्या कन्या अजमल यांची मानसिकता जाणतात, आसामला देशद्रोह्यांच्या हातात जाऊ दिले जाणार नसल्याचे विहिंपने म्हटले आहे.
नड्डा यांचा राहुल यांना प्रश्न
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी बदरुद्दीन अजमल आणि त्यांच्या पुत्राला लक्ष्य केले आहे. बदरुद्दीन अजमल यांनी गमोसा (आसाममधील पारंपरिक गमछा) फेकला, आता बदरुद्दीन अजमल आसामची ओळख ठरले आहेत का? संधीसाधूपणाचे राजकारण करणारे लोक बदरुद्दीन अजमल यांचा हात पकडत असल्याचे नड्डा यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.
बदरुद्दीन यांचेही वक्तव्य
यापूर्वी युनायटेड डेमोक्रेटिक प्रंटचे अध्यक्ष बदरुद्दीन अज्माल यांनी लोकसंख्यावृद्धीवर विचित्र विधान केले होते. मनाला गुंतविण्याचे कुठलेच साधन नसल्याने लोक अधिक मुलं जन्माला घालत असल्याचे बदरुद्दीन म्हणाले होते. अब्दुर रहीम अजमल हे त्यांचेच पुत्र आहेत.