चिमुरडय़ांचे पंतप्रधान मोदींना पत्र
आसाममधील दोन मुलांचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांना लिहिले गेले आहे. पत्रात मुलांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शर्मा यांच्याकडे निरागस विनंती केली आहे. मुलांनी पत्रात स्वतःच्या दातांच्या समस्येवरून तक्रार केली आहे.
6 वर्षीय रईसा रावजा अहमद आणि 5 वर्षीय आर्यन अहमद यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शर्मा यांना दोन वेगवेगळी पत्रं पाठविली आहेत. रावजा आणि आर्यन यांनी पत्रात स्वतःच्या दातांवरून त्यांच्याकडे तक्रार केली आहे.
आम्हाला आमच्या पसंतीचे खाद्यपदार्थ खाताना मोठा त्रास होतोय, कारण आमचे दुधाचे दात पडल्यावर नवे दात येताना खूप वेळ लागतोय असे या दोघांनी पत्रात म्हटले आहे. आमच्या समस्येवर सुनावणी व्हावी म्हणून हे पत्र लिहिल्याचे या दोघांनी सांगितले आहे.
फेसबुकवर या दोन्ही मुलांच्या पत्रांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट मुलांचे काका मुख्तार अहमद यांच्याकडून शेअर करण्यात आली आहे. कृपया आवश्यक पावले उचला असे या दोन्ही मुलांनी पत्राद्वारे मोदी आणि शर्मा यांना संबोधित करत म्हटले आहे. कशाप्रकारे आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ नीटपणे सेवन करू शकत नाही याचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
ही पोस्ट 25 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. मुलांचे हे पत्र सोशल मीडियावर अत्यंत पसंत केले जात आहे. युजर्सना त्यांची ही प्रेमळ विनंती पसंत पडली आहे. पत्रावर मुलांनी छोटे चित्रही काढले आहे.