प्रतिनिधी/ दापोली
निसर्ग चक्रीवादळानंतर दापोली तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अनेक ठिकाणचा वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. यामुळे तालुक्यातील 19 गावांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे. या गावांना 16 जनरेटरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका दापोली तालुक्यातील सर्व नळपाणी योजनांना बसला. चक्रीवादळात सर्वच गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. यावर प्रशासनाने तातडीचा उपाय म्हणून दुसऱया जिह्यातून 22 जनरेटरची व्यवस्था केली होती. या 22 जनरेटरच्या सहाय्याने तालुक्यातील 39 गावातील 40 नळपाणी योजनांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. याचा तालुक्यातील 156 वाडय़ांना लाभ मिळून 30 हजार 945 लोकसंख्येला वीजपुरवठा खंडित असतानादेखील पाणीपुरवठा करण्यात आला होता. यापैकी काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाल्याने 6 जनरेटर बंद करण्यात आले आहेत. यामुळे आता 16 जनरेटरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
आतगाव, भाटवाडी, केळशी, उटंबर, डायऱया, उटंबर कोळीवाडा, आडे, पाडले, शिवाजीनगर, लोणवडी, डौली, मांणकवणेवाडी, विरसई, दळखण, वांझलोली, हनुमानवाडी, सुकोंडी, केळशी बोअरवेल, मांदिवली, सुकोंडी माचेकरवाडी, बौद्धवाडी, सातआंबा, पिसई, कांगवई आदिवासीवाडी, दुर्गवाडी, गवळवाडी, पाचवली वाळुंजवाडी, पाचवली सरोदेवाडी आदी वाडय़ांना अद्याप पाण्यासाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे.