वार्ताहर / दोडामार्ग:
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिदय़रेषेखालील कुटुंबांना तहसीलदार संजय कर्पे यांच्या हस्ते 20 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिदय़रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सदर कुटुंबास प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाते. त्यानुसार बुधवारी दोडामार्ग तहसीलदार संजय कर्पे यांच्या हस्ते विर्डी येथील गुरुदास विष्णू चोर्लेकर, पणतुर्ली येथील गौरी लवू सावंत व पिकुळे येथील पुष्पा बाळकृष्ण जाधव यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी राजन गवस, अव्वल कारकून पल्लवी पेडणेकर आदी उपस्थित होत्या.