ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषदेत दारूबंदी कायदा दुरुस्ती विधेयकावर बोलताना एक मोठं विधान केलंय. त्यांनी, विषारी दारूमुळं काही लोकांचा मृत्यू झालाय. मात्र, त्यांना कोणताही दिलासा मिळणार नाहीय. जे लोक बापूजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत, ते लोक कदापि हिंदुस्थानी असू शकत नाहीत. दारु पिणारे लोक महापापी आहेत, त्यांच्याबद्दल सहानुभूती नाहीय, असं कठोर मत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, नितीश कुमार यांनी महात्मा गांधींनीही दारू पिण्यास विरोध केला होता आणि जे त्यांच्या तत्त्वांच्या विरोधात जातात ते ‘महापापी आणि महायोग’ असल्याचे ते म्हणाले. मी या लोकांना भारतीय मानत नाही. दारू शरीराला पिणे हानिकारक आहे हे माहीत असूनही लोक दारूचे सेवन करतात आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना ते जबाबदार आहेत, राज्य सरकार नाही. चूक त्यांची आहे. दारू विषारी असते हे माहित असूनही ते दारुचं सेवन करतात, असंही ते म्हणाले.
बिहार विधानसभेने बुधवारी राज्यात प्रथमच गुन्हेगारांसाठी दारूबंदी कमी कडक करण्याचा प्रयत्न करणारे एक दुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर आणि मंजूर केल्यानंतर नितीश कुमार यांनी हे विधान केलं. राज्य सरकार दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्यामुळे बिहारमध्ये हूच दुर्घटना होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना ते उत्तर देत होते.