प्रतिनिधी/ सातारा
ताईगडेवाडीमध्ये उभी बाटली आडवी करण्यासाठी मतदान झाले. त्याचा निकाल जाहीर करण्यात यावा, मतदानावेळी गैरप्रकार करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी सिताई फौंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे या करत असून उपाध्यक्षा प्रतिभा साठे, सचिव प्रतिभा शेडगे, खजिनदार माधुरी काळे, सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, संगीता ताईंगडे, शालन ताईगडे, रुपाली ताईगडे, इंदूमती शिबे, मालन ताईगडे आदी महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पाटण तालुक्यातील ताईगडेवाडी येथे आडवी बाटली करण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. मतदान प्रकियेचा निकाल जाहीर करणयत यावा, एक वर्ष उलटून गेला तरीही निकाल जाहीर केला नाही. या पाठीमागे प्रशासनाची भूमिका काय आहे. हे स्पष्ट होत नाही. एकीकडे महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात. तर दुसऱया बाजूला अशाप्रकारे आजही महिलांना न्याय मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही, असे म्हटले आहे.