वार्ताहर / दिघंची
दिघंची येथील गायरान जागे मधील झालेले अतिक्रमण पंचनामे करून काढावेत या मागणीसाठी दिघंची येथे आज उपोषणाला सुरुवात करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज भोसले ,अमित वाघमारे, विलास बनसोडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
सदर गायरान जागे मधील झालेले अतिक्रमण तीस तारखेपर्यंत पंचनामे करून काढावे अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा वरील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. निवेदनात सांगितले आहे की दिघंची मधील गायरान जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
सदर शासनाच्या गायरान जमिनीचा त्वरित पंचनामा करावा व बेकायदेशीर पणे झालेले अतिक्रमण जमीनदोस्त करावी व गोरगरिबांना शासकीय नियमानुसार कमीत कमी जागा देऊन लोकांचे पुनर्वसन करावे.
यावेळी उपोषणाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख ,डॉ. उन्मेष देशमुख ,जितेंद्र मोरे,अजित मोरे,केशव मिसाळ ,ऋषिकेश गुरव,चंद्रकांत पुसावळे, प्रकाश शिंदे,बळीराम रणदिवे,मंगेश रणदिवे ,डॉ.दिगंबर मोरे त्यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला पाठिंबा दिला.