व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱया दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने उद्योजक वैभव रेखीसोबत विवाह केला आहे. सोमवारी संध्याकाळी दियाच्या घरीच पार पडलेल्या या विवाहसोहळय़ात कुटुंबीय तसेच मोजके मित्र सामील झाले. दियाने विवाहसोहळय़ाची छायाचित्रे मंगळवारी प्रसारित केली आहेत. या छायाचित्रांसह दियाने अत्यंत सुंदर असा संदेशही दिला आहे.
पेमाचे एक पूर्ण चक्र ज्याला आम्ही घर म्हणतो आणि त्याची चाहुल किती चमत्कारिक आहे. दरवाज उघडा, ते तुम्हाला शोधून काढेल. पूर्णत्व आणि आनंदाच्या क्षणांना स्वतःच्या उत्साही कुटुंबासोबत अनुभवत आहे. सर्व कोडय़ांना उत्तर मिळावे, मनाच्या सर्व जखमा भरून निघाव्यात आणि प्रेमाची किमया चहुबाजूने फैलावत रहावी असे दियाने नमूद केले आहे. दियाला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नेहा धूपिया, तापसी पन्नू, सौफी चौधरी, अथिया शेट्टी, अमृता अरोरा यांनी समाजमाध्यमांवर तिचे अभिनंदन केले आहे. ईशा गुप्ता, यामी गौतम, मलाइका अरोरा, लारा दत्ता, उर्मिला मातोंडकर यांनीही उत्तम वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.