बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात शनिवारी सर्वाधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात शनिवारी बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. दरम्यान, ६१,७६६ रुग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८,९१,०४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात शनिवारी ३१,१८३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २३,९८,९२५ वर पोहोचली आहे. तर शनिवारी राज्यात विविध जिल्ह्यातील ४५१ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यात आतापर्यंत २४,६५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी जिल्ह्यात ८,२१४ नवीन रुग्णांची भर पडली.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. सक्रिय प्रकरणे, जी वाढतच होती आणि १६ मे रोजी सहा लाखांच्यावर राज्यात सक्रिय रुग्ण होते. आता ती संख्या ४,८३,२०४ वर आली आहे.