ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. त्यातच राजधानी दिल्लीत लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. मागील सात दिवसात राजधानीत दररोज जवळपास दीड लाख पेक्षा अधिक नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. तर या महीन्यात आतापर्यंत 32 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील महीन्यात हा आकडा 16 लाख इतका होता. तज्ञांच्या मते अशा प्रकारे लसीकरण सुरू राहीले तर लवकरच सर्व लोकांचे नागरिकरण पूर्ण होईल आणि तिसरी लाटेचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
दिल्लीत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला असून 1 कोटी 31 लाख पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 94 लाख नागरिकांना पहीला तर 32 लाख नागरिकांचे दोन्ही डोस घेवून पूर्ण झाले आहेत. तर मागील 10 दिवसांत 11 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. लस घेणाऱयांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. 18 ते 44 वयोगटातील 59 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये 49 लाख नागरिकांनी पहीला आणि 10 लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या 92 लाख आहे. पात्र असलेल्या साधारण 54 टक्के तरूणांनी लसीचा पहीला डोस घेतला आहे.
- आतापर्यंत 62 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण
राजधानी दिल्लीत आतापर्यंत 94 लाख नागरिकांनी लसीचा पहीला डोस घेतला आहे. तर 62 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तज्ञांच्या मते हा आकडा 80 टक्के पर्यंत पोहचणे गरजेचे आहे.