ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 22 हजार 122 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 42 हजार 320 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 56 लाख 02 हजार 019 वर पोहचली आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 361 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 89 हजार 212 वर पोहचला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 51 लाख 82 हजार 592 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 92.51 % इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.59 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 27 हजार 580 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16.83 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 लाख 29 हजार 301 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 24 हजार 932 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- मुंबई : रुग्ण दुप्पटीचा काळ 334 दिवस
मुंबईतून देखील थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात तब्बल 1,312 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,98, 867 वर पोहचली असून त्यातील 6,53,998 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कालच्या दिवशी 48 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 14,671 वर पोहचली आहे. सद्य स्थितीत 28,086 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.