अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 6 सप्टेंबर 2021, स.11.00
● रविवारी अहवालात 311 बाधित
● एकूण 10,641जणांची तपासणी
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.97
● मृत्युदर घटतोय, स्थिती डआटोक्यात
● चाचण्यांची संख्याही झाली कमी
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारी प्रथमच बाधित वाढीचा वेग चारशेच्या खाली घसरला होता. तेव्हा 351 जणांचा अहवाल बाधित आला होता. त्यानंतर शनिवारी हा वेग थोडासा वाढला. मात्र, रविवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा मोठा दिलासा मिळाला असून, बाधितवाढ चारशेच्या खाली राहिली. खूप दिवसांनी ती तीनशेच्या नजीक पोहचली आहे. रविवारी अहवालात 311 जणांचा अहवाल बाधित आला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही 2.97 टक्के एवढा खाली घसरला आहे.
पॉझिटिव्हिटी दराचा आलेख खाली
सप्टेंबर महिन्याच्या आरंभापासून जिल्ह्यातील बाधित वाढीचा वेग मंदावत असतानाच तो आणखी मंदावत असल्याने स्थिती आटोक्यात येण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत. रविवारी रात्री प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार 10,648 जणांची तपासणी करण्यात आल्यानंतर 311 जणांचा अहवाल बाधित आला आहे जवळपास तीन चार महिन्यांनी प्रथमच बाधित वाढ तीनशेच्या नजिक खाली घसरली आहे. त्यामुळे स्थिती आटोक्यात येऊ लागली आहे.
चाचण्यांची संख्याही कमी झाली
गेल्या महिन्यात जिल्हाभरात एकूण चाचण्यांची संख्या दहा ते पंधरा हजाराच्या घरात होती आणि पॉझिटिव्ह दर वाढलेला होता. त्यामुळे सातत्याने तीन अंकी वाढ सुरू होती व ती आठशे हजारच्या आसपास रेंगाळत होते मात्र ऑगस्टच्या मध्यानंतर पॉझिटिव्हिटी दर खाली घसरत चालला असून, सप्टेंबरच्या आरंभापासून पॉझिटिव्हिटी दराचा आलेख खूपच खाली आला असल्याचा दिलासा लाभत आहे. आत्ताही बाधित वाढ तीन अंकी संख्येने सुरू असली तरी ती चारशेच्या खाली घसरली असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे कोरोनाचे संकट लवकर टळावं, अशीच प्रार्थना जिल्हावासिय करत आहेत.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 18,46,323
एकूण बाधित 2,41,998
एकूण कोरोनामुक्त 2,28,343
मृत्यू 6,060
उपचारार्थ रुग्ण 11,009
रविवारी जिल्हय़ात
बाधित 540
मुक्त 62
मृत्यू 01