ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निर्बंधांमध्ये आणखी अधिक शिथिल केले जाणार आहेत त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
याबाबत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आज आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटय़ा व समुद्रकिनारे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर बंधनकारक असेल असेही या आदेशात नमूद केले आहे.
- मुंबई महापालिकेने नेमके काय म्हटले आहे ?
राज्य शासनाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपटय़ा व समुद्र किनारे हे सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
मात्र असे असले तरीही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासारख्या इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे या भागात असणाऱया छोटे दुकानदार आणि व्यापाऱयांना देखील फायदा होणार आहे. कारण गेले अनेक दिवस ही ठिकाणे बंद असल्याने त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत होते. मात्र, आता महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे येथील व्यापाऱयांना देखील दिलासा मिळाला आहे.
- लोकलमध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी
4 महिन्यांनी सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली आहे.लसीच्या दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. लोकलच्या फेऱयांमध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी1 लाख 20 हजार लोकांनी काढला पास.
- हॉटेल, रेस्टॉरंट व मॉल रात्री 10 पर्यंत सुरू असणार
दरम्यान, यापूर्वीच हॉटेल, रेस्टॉरंट व मॉल सुरू ठेवण्यात रात्री 10 पर्यंत मुभा देण्यात आली आहेमात्र, लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले असले पाहिजे, असे राज्य सरकारने आदेशात म्हटले होते. तर राज्यातील सर्व नाट्यगृह, मल्टिप्लेक्स बंदच असतील. तसेच, मंदिरांसह सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.