स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या विरोधाचा मुद्दा आघाडीने निकाली काढला. पवारांच्या आवाहनानुसार हे पक्ष दिल्लीत एकत्र पण गल्लीत वेगळे लढण्याची चिन्हे आहेत!
उत्तर प्रदेशातील लखीमपुर घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्यामुळेच अजित पवारांकडे ‘पाहुणे’ पाठवण्यात आले, असा आरोप करत, ज्ये÷ नेते शरद पवार यांनी भाजप विरोधातील लढाई आणखी तीव्र होणार, हे स्पष्ट केले आहे. केंद्रातील सरकारची कृती शेतकऱयांच्या विरोधात असून, आता हे सरकार हटवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात असे आवाहन पवार यांनी सोलापुरात केले आहे. निवडणुकीपूर्वी आघाडी न करता निकालानंतर करण्याची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची सूचना, काँग्रेस पक्षश्रे÷ाrंना मान्य आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पवार वारंवार काँग्रेसला त्याची आठवण करून देत आहेत. यापूर्वी तीव्र शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, त्यांची सोलापुरातील शैली पूर्वीपेक्षा वेगळी होती. भाजपला केंद्राच्या सत्तेवरून घालवणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र लढले तर हे शक्मय होईल असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढवल्याचा फायदा आपल्याला झाला अशी राज्यातील काँग्रेस नेतृत्वाची भावना आहे. उपराजधानी नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत 16 पैकी 9 जागा जिंकून भाजपला रोखले आणि तिथे आपली सदस्य संख्या वाढवली याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री सुनील केदार यांना खूपच आनंद झालेला आहे. पदवीधरच्या निवडणुकीत भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांचा पराभव करून काँग्रेसच्या अभिजित वंजारी विजयी झाले होते. तेव्हापासूनच नागपुरात काँग्रेस नेत्यांना उत्साह आला आहे. त्याचा परिणाम काँग्रेस सगळीकडेच निवडणुकीपूर्वी आघाडी नको असा मुद्दा लावून धरू लागली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत आलेल्या निकालामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका लागल्या होत्या. या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला ओबीसींच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल असे वातावरण भाजपने बनवले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. जिल्हा परिषदेच्या 85 पैकी 31 जागा पूर्वी भाजपकडे होत्या त्याची आठ जागा कमी होऊन आता भाजपला 23 जागा मिळाल्या आहेत तर हा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने फायदा झालेला दिसून आला आहे. मतदारांनी भाजपलाही पूर्णपणे नाराज न करता सर्वाधिक जागा पटकावणारा पक्ष ठरवले आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे खूष ठेवले आहे.
पालघरमध्ये प्रथमच प्रत्यक्षात आलेली भाजप आणि मनसेची बहुचर्चित युती मुहूर्तालाच सपशेल अपयशी ठरली. पालघरमध्ये शिवसेनाच प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या पाच जागा त्यांनी मिळवल्या. जिल्हा परिषदेत सेनेची संख्या 18 वरून 20 झाली. राष्ट्रवादी, भाजप प्रत्येकी चार आणि कम्युनिस्ट आणि अपक्षांनी एक जागा मिळवली. संपूर्ण निवडणुकीत मनसेच्या हाती फक्त एक पंचायत समितीची जागा आली. अकोला जिह्यात वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्व मतदारांनी अधिक भक्कम केले. पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपला धक्का बसला आणि शहादा व नंदुरबार दोन पंचायत समित्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. भाजपच्यादृष्टीने समाधानाची बाब म्हणजे शिवसेना या निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे!
या निवडणुकीतील एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तीनही सत्ताधारी पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनेही स्वतंत्र निवडणुक लढवली. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मतदार संघातील जागा प्रहारने जिंकल्याने मिटकरी बच्चू कडू यांच्यावर भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केला. त्यावर संतप्त होऊन कडू यांनी मंत्रीपद उतरून ठेवेन असा इशारा दिला. पालघरमध्ये सेनेचे खासदार गावित यांच्या पुत्राचा पराभव आणि त्यांना तिसऱया क्रमांकाची मते मिळणे, या गोष्टी आघाडीच्या यशात मिठाचा खडा टाकणाऱया ठरल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना वेगवेगळे लढून आपले अस्तित्व ठेवण्याला वाव देऊन तीन पक्षांनी खेळी खेळली होती. ज्यामुळे नाराजांची मते थेट भाजपला जाऊ न देण्याचे त्यांचे उद्दिष्ट सफल झाले. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तीन पक्ष वेगवेगळय़ा लढण्याची ही चिन्हे आहेत. स्थानिक नेत्यांचे परस्परांचे पटत नाही आणि त्यांना हाताने एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काही भाजपच्या हाती लागण्याची शक्मयता आहे, त्यामुळे विभागणी करून आपली मते आपल्याचकडे राखण्यावर या तिन्ही पक्षांचा कल असेल हेच स्पष्ट होत आहे.
छापा, नोटीस यांचा दबाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या भगिनी सर्व कुटुंबातील व्यक्तींवर विभागाने घातलेल्या छाप्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खवळला आहे. आपल्या रक्ताच्या नात्यातील आहेत म्हणून बहिणींच्या आस्थापनांवर छापे का घालता असं त्यांनी सवाल केला नाही तर राष्ट्रवादीने पुण्याच्या विधानभवन परिसरात अजित पवार बैठकीसाठी आले असताना त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूरचा दौऱयावर असलेल्या शरद पवारांनी तिन्ही पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. हे एकत्र येणे लोकसभा निवडणुकीसाठी असेल असे स्पष्ट होत असून यापुढच्या नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे पक्षात पालकमंत्र्यांबाबत असलेली कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त होऊन आणि वातावरण तुमचं राहणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचे दिसून येते आहे.
शिवराज काटकर