ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या सीमेवर मागील 70 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत शिरता येऊ नये, यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी, शौचालयाअभावी हाल सुरू आहेत.
दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळाभोवतालचे रस्ते ब्लॉक करून इंटरनेट, वीज, पाणी आणि मोबाईल टॉयलेट यासारख्या सेवाही बंद ठेवल्या आहेत. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांनी उभारलेल्या भिंतीच्या पलीकडे जवळपास 1.5 किमी पर्यंत बॅरिकेट्स लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहचता येत नाही. दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे.