ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली आणि उत्तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मंगळवारी दुपारी अचानक काळे ढग दाटून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. आधीच थंडीची लाट व धुक्याचा सामना करणाऱ्या दिल्लीत पावसामुळे आणखी अंधार पडला आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला.
गजियाबाद आणि गुरुग्राममध्ये जोराचा पाऊस आणि थंड हवा सुटली असल्याने दिल्लीकरांची तारांबळ उडाली आहे. थोडा वेळच पडलेल्या या पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने लोकांना ये जा करण्यास अडचण होत आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री देखील गुरुग्राम आणि फरिदाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.