नवी दिल्ली
दिल्लीतील कोरोना स्थिती आटोक्मयात आणण्यात केजरीवाल सरकारला पूर्णतः अपयश आले असून राज्यात आता राष्ट्रपती राजवटीशिवाय गत्यंतर नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी केला आहे. त्वरित राष्ट्रपती राजवट दिल्लीत लागू करून लोकांची दुर्दशा संपवावी. केजरीवाल सरकार केवळ तोंडची वाफ दौडत असून प्रत्यक्ष कृतीच्या नावाने शून्य दिसून येत आहे, अशीही टीका या खासदाराने केली. आम आदमी पक्षाचेच आमदार शोएब इक्बाल यांनीही दोन दिवसांपूर्वी हीच मागणी केली होती. दिल्ली सरकार कोरोनासंदर्भात अपयशी ठरल्याचा आरोप या सरकारच्याच आमदारांनी केल्यामुळे बरीच खळबळ उडाली होती.