नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरमध्ये 4.5 तर राजस्थानमध्ये 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या अहवालानुसार गुरुग्राम-हरियाणाच्या नैत्र+त्येकडे 63 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे हादरे दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात जाणवले. भूकंपानंतर लोक बऱयाच भागात घराबाहेर पडले आणि बराच काळ बाहेर राहिल्याचे स्थानिक पातळीवरून सांगण्यात आले. तथापि, जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.