ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ईशान्य दिल्लीत फेब्रुवारीमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 15 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या 10 हजार पानी आरोपपत्रात 747 लोकांची साक्षीदार म्हणून नोंद आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये आतापर्यंत 57 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये 24 फेब्रुवारीला दिल्लीत दंगल भडकली. यात 53 जणांचा मृत्यू झाला होता. तर अंदाजे 200 जण जखमी झाले होते. या दंगलीचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी 15 जणांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) इतर कलमांन्वये दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.