उदयनराजेंचा जिल्हाधिकाऱयांना सवाल,
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजेंचे शुक्रवारी साताऱयात भव्य स्वागत झाले. लगेच दुसऱया दिवशी सकाळी त्यांनी शहर व जिह्याचा आढावा कार्यकर्त्यांकडून घेतला. त्यांनी जिह्याच्या सर्वसामान्यांच्या व्यथाच पाहून लॉकडाऊनबाबत तीव्र खेद व्यक्त केला. देशाची राजधानी दिल्ली सुरु आहे तर मराठय़ांची राजधानी सातारा का बंद. लोकांना हळूहळू सर्व काही सुरु करा. 10 ते 2 कोरोना नाही का?, असा रोकडा सवालच खासदार उदयनराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केला. तब्ब्बल दीड तास त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली.
खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांचे भव्य स्वागत शुक्रवारी साताऱयात करण्यात आले. त्यानंतर शहर आणि जिह्याचा त्यांनी आढावा घेतला. शनिवारी सकाळी त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना गाठले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी तब्बल दीड तासभर चर्चा केली. लॉकडाऊन हा पर्याय नाही. हेही जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेले आहे. एकदम सारे खुले केले तर चालणार नाही. हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत केले पाहिजेत. जिल्हाधिकाऱयांनी जिह्याचा गाडा पुन्हा पूर्ववत हळूहळू सुरु करावा. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांनाही आपले पोटची भूक भागवता येईल. रोजीरोटी सुरु होईल. लॉकडाऊन सुरु ठेवून मोठे आर्थिक संकट निर्माण होईल. मी दिल्लीला परवा होतो तेथे सर्व काही सुरु आहे. मग साताराच का बंद. दुपारी 2 नंतर सर्व बंद ठेवायचे. तेव्हा कोरोना येतो आणि 10 ते 2 या वेळेत कोरोना येत नाही असे काही आहे का?, सातारा जिल्हा सर्व सुरळीत पुन्हा सुरु करावा. अशी मागणी केली आहे. लवकरच सातारा जिल्हा सुरु करतील. लॉकडाऊनबाबत मला व्यक्तीगत विचारले तर हे काय पटत नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले.