ऑनलाईन टीम / दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर मागील काही महिने बंद आहे. त्यानंतर अक्षरधाम प्रशासनाने आता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार 13 ऑक्टोबर म्हणजेच आज सायंकाळी पाच वाजल्यापासून हे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात येणार आहे.
सुरुवातीला थोड्या थोड्या वेळाने भाविकांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच 7.15 वाजता प्रसिद्ध ‘सहज आनंद वॉटर शो’ प्रस्तुत केला जाईल. त्यासोबतच काही प्रमाणात खाद्य पदार्थांचे स्टॉल, हर्बल उत्पादनाचे स्टॉल उघडले जाणार आहेत.