प्रतिनिधी / शाहुवाडी
केंद्र शासनाने शेतकरीविरोधी केलेले कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्ली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघर्ष समन्वय समिती शाहूवाडी यांच्यावतीने शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
केंद्र शासनाने घेतलेली भूमिका अन्यायकारक असून शेतकरी विरोधी केलेले कायदे त्वरित रद्द करावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी संघर्ष समितीने ही धरणे आंदोलन करून पाठिंबा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व भाई भारत पाटील यांनी केले याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश माऊटकर ,योगेश कुलकर्णी, अनिल कांबळे, पंडित केसरी, बाळासाहेब बेर्डे, बळी पाटील, बाबुराव पाटील, दस्तगिर. अत्तार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.