प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांच्या समस्या दिल्ली सरकारसमोर मांडून त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन. शेतकरी जगला तरच देश जगेल. तेव्हा शेतकऱयांच्या हिताच्यादृष्टीनेच मी काम करेन, असे आश्वासन कर्नाटक राज्य सरकारचे केंद्रीय विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी दिले. शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी शेतकऱयांना हे आश्वासन दिले.
भाजप सरकारने नेहमीच शेतकऱयांचे हित जपले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकऱयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकऱयांना नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्यांना सहकार्य केले आहे, असे शंकरगौडा पाटील यांनी यावेळी सांगितले.
बळ्ळारी नाला, हलगा-मच्छे बायपास करताना शेतकऱयांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने मी प्रयत्न करेन. शेतकऱयांना विश्वासात घेऊनच पुढील नियोजित आराखडा तयार करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार आहे. शेतकऱयांच्या कोणत्याही जमिनी प्रकल्पांसाठी घेताना त्या बाजारभावांप्रमाणेच खरेदी करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला आहे. शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, प्रियश होसूरकर, सुनील खन्नुकर, अजित पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.