वरकुटे / वार्ताहर :
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरूच आहेत. पण आता गावपातळीवरही दि. 30 एप्रिलपासून 5 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गावातील सर्व प्रकारची दुकाने या कालावधीत बंद राहणार आहेत. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. जर एखादा ग्रामस्त विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत दिवड तसेच ग्राम आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आले आहे.